To download the Biodata click here

जन्म : दि.12/01/1953, चालु वय 65 वर्षे

शिक्षण : SSLC 1968 साली रोज 10 KM पायी चालत पूर्ण केले.

शालेय जीवनात सन 1967 मध्ये "थेफ्ट अलार्म" या उपकरणास पहिला पुरस्कार, तसेच " लिक्विड लेवल कंट्रोल स्विच, मल्टीटाईमर, इमर्जन्सि लॅम्प" इ।। उपकरणांची निर्मिती

नोकरी : 1) ग्रामपंचायत मांगूर जिल्हा बेळगाव येथे क्लार्क कम् सेक्रेटरी सेवा काल 1.5 वर्षे 

2) श्री हनुमान सह. दूध संस्था यळगूड जिल्हा कोल्हापूर येथे दूध संकलक ते सचिव, सेवा काल 42 वर्षे, सर्वांचे सहयोग व मार्गदर्शनामुळे, विविध कार्यपध्दतीमध्ये नियोजन,शिस्त, वक्तशिरपणा आणि कार्यतत्परता यामध्ये आदर्श निर्माण केला आहे.त्याबद्दल संस्थेने 2013 मध्ये सेवानिवृत्तेचेवेळी सन्मानपत्र देवून सत्कार केला असे.

सदर संस्थेस महाराष्ट्र शासनाने "सहकार महर्षि" हा पहिला पुरस्कार सन 2012 मध्ये दिला आहे.

संगणक क्षेत्रातील योगदान : Y2K प्रॅाब्लेम 1997 मध्ये दूर केला, यळगूड येथे COMPUTER LAN SYSTEM 1992 मध्ये यशस्वी केली, तसेच WIFI तंत्रज्ञान सन 2005 साली पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथम यशस्वी केले.दै पुढारी सकाळ तरुणभारत पुण्यनगरी महासत्ता इ।। पेपरमध्ये पहिल्यापानावर चार कॅालम बातमी देवून प्रसिध्दी दिली होती.

श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि. हुपरी येथे सन 2000 पासून संगणक सल्लागार म्हणून कार्यरत, बँकिंग क्षेत्रात 10 KM परिसरात  प्रथमता WIFI तंत्रज्ञानाचा रेडिओ फ्रिक्वेन्शीद्वारे हेड आॅफीस व सर्व शाखेकडील सर्व संगणक यंत्रणा जोडून  पुरेपूर सुरक्षित उपयोग केला आहे याबद्दल मंत्रीमहोदयांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार,इतरत्रही सहकारी संस्था व प्रायव्हेट प्रकल्पात वेळोवेळी मार्गदर्शन.

सन 1973 मध्ये श्री सद्गुरु निरंजन महाराज यांचेकडून शाम्भवी दिक्षा अनुग्रह,

सन 1978 मध्ये विवाह, एकच मुलगा चि.विवेक BE COMPUTER पुणे येथे MNC मध्ये सेवेत.

अध्यात्मिक सेवा :  सन 1993 पासून हुपरी येथे सतसंग मंडळ सुरु केले असून दर रविवारी सकाळी 10 ते 12 वेदांत विषयक ग्रंथाचे वाचन प्राणायम,ओंकार आणि ध्यान असे कार्यक्रम अव्याहतपणे सुरु आहे.

सन 1998 पासून श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम मौजे वडगाव जिल्हा कोल्हापूर येथे उत्तराधिकारी "विनयानंद" म्हणून नियुक्ती, अनेक दुर्मिळ ग्रंथांचे प्रकाशन,दोन एकर शेत जमिनीवर आश्रम,ध्यानमंदिर,अन्नक्षेत्र व सभामंटप उभारणी. साधकांचे सहयोगातून दर पौर्णिमा व विविध जयंत्या इत्यादि वार्षिक 24 कार्यक्रम अव्याहतपणे चालु राहतील अशी फंडस व्यवस्था केली आहे.

" समन्वय से समाधि " हे आश्रमाचे बोध वाक्य असून " शुध्द,स्थिर,व्यापक आणि परिपूर्ण " हा कन्सेप्ट आहे.

सदाचार सार साचा । मंत्र दिधला जीवनाचा ।।

सर्व धर्माचा समन्वय । मार्ग दाविला अद्वय ।।

।। विज्ञानातील विध्वंसकता आणि अध्यात्मातील अंधानुकरण दूर करणे ।।

।। शुद्ध आचार विचार आणि कर्म हीच पूजा ।।

 हा सारभूत विचार रुजविणे हेच ध्येय  आहे.

गौरव : सन 1989 ते सन 2016 अखेर विविध संस्था, ट्रस्ट आणि धार्मिक संस्थाकडून रोख रक्कम, स्मृतिचिन्हे देवून आदर्श सेक्रेटरी, उत्तम प्रशासक, धार्मिक सुसंस्कार, जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ सामाजिक पुरस्कार सन २०११ व ज्ञानदिप पुरस्कार सन २०१६  इत्यादि अनेक पुरस्कार प्राप्त.

 

 

 
OM NAMO SHIVA                                         OM NAMO SHIVA